शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

शेट्टींची ‘व्होट बँक’ राखण्यासाठी कसरत : अमृत योजनेचे राजकारण नव्या वळणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 23:21 IST

इस्लामपूर : इचलकरंजीतील अमृत योजनेसाठी वारणा नदीतून पाणी उचलण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. मात्र

ठळक मुद्देइचलकरंजी पाणी योजनेस विरोध टाळला

अशोक पाटील ।इस्लामपूर : इचलकरंजीतील अमृत योजनेसाठी वारणा नदीतून पाणी उचलण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी ‘इचलकरंजीला पाणी देताना वारणाकाठावर अन्याय होऊ देणार नाही’ असे वक्तव्य करुन शेतकºयांची ‘व्होट बँक’ शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इचलकरंजीला हे पाणी मिळणार असल्याने, त्यांनी योजनेला उघड विरोध करणे टाळले आहे.

वारणेचे पाणी इचलकरंजीला नेल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे ही योजना होऊ देणार नसल्याची भूमिका शेकापचे ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील, ढवळीचे माजी सरपंच शरद पाटील, वाळवा पंचायत समितीचे विरोधी गटनेते राहुल महाडिक, वारणा काठावरील गावांनी घेतली आहे. त्यासाठी पक्षविरहित वारणा बचाव कृती समिती स्थापन केली आहे.

राजू शेट्टी यांनी नुकताच वाळवा तालुक्यात दौरा केला. कणेगाव येथे शेतकºयांनी अमृत योजनेचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी खा. शेट्टी यांनी स्वत:च्या मतपेढीचा विचार करून इचलकरंजीकरांना दुखवायचे नाही आणि वाळव्यातील शेतकºयांचा रोषही पत्करायचा नाही, या भूमिकेतून सामंजस्याने तोडगा काढू, असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची समजूत काढली व वेळ मारून नेली.

वारणा खोºयातील जिरायती जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यात मोठा संघर्ष झाला होता. वसंतदादांनी चांदोली येथे धरण होण्यासाठी मोठे प्रयत्न केले. परंतु सांगली जिल्ह्यातील शेवटच्या दुष्काळी भागापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी खुजगाव येथे धरण व्हावे म्हणून राजारामबापूंनी आग्रह धरला होता. या दोघांचा वाद साºया महाराष्ट्राला ज्ञात होता. शेवटी वारणा नदीवर चांदोली येथे धरण झाले. त्या वादाचे पडसाद अजून उमटत आहेत. 

खा. राजू शेट्टी जनसामान्य आणि कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत. एकीकडे लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तर या योजनेमुळे शेतकºयांच्या शेतीला पुरेसे पाणी मिळणार नाही. हे दोन्ही प्रश्न शेट्टी यांच्या जिव्हाळ्याचे बनले आहेत. त्यामुळे त्यांनी इचलकरंजी व वारणा पट्ट्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे.- राहुल महाडिक, विरोधी गट नेते, वाळवा पंचायत समिती.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगली